Filled Under: ,

आगाखान राजवाडा

आगाखान  राजवाडा हा  येरवड्यामधे  ,बंद  गार्डन पुलापासून १  ते  २  किमी  अंतरावर  पुणे – नगर  रोड  वर  येतो .आगाखान  राजवाड्याचे  १९  एकरावर  पसरलेला  असून  त्यापैकी  ७  एकर  जमीन  आगाखान  राजाने  १९६९  साली  गांधी   नतिओनल  मामोरीअल  ला  दिली .  आगाखान  राजवाडा हा  स्थापत्य्शात्राचा  उत्क्रष्ट  नमुना  आहे .

           ८ ऑगस्ट  १९४२  रोजी  महात्मा  गांधीनी  “भारत  छोडो ” चा नारा  दिला .त्यानंतर  महात्मा  गांधीना  अटक  करून  पुण्यात  आगाखान राजवाड्यामधे  ठेवण्यात आले .त्यानंतर २  ते  ४  दिवसांनी  कस्तुरबा  गांधीनी  मुंबई  मधे  आंदोलन  उभारलं  त्यामुळे  त्यांनादेखील  आगाखान  राजवाड्यामधे  आणण्यात  आले .महात्मा  गांधींचे  सचिव  महादेवभाई  देसाई  यांचे  हृदयविकाराने  १५  ऑग  १९४२  रोजी   निधन  झाले  . २२  फेब्रुवारी  १९४४  रोजी  कस्तुरबा  गांधीचे  देखील  निधन  झाले .त्यांची  समाधीस्थळे  राज्वाद्याच्यासमोर  आहेत . महात्मा  गांधी त्या  समाधींचे  दर्शन  घेतल्याशिवाय  जेवण  करत नसत.

          राजवाड्यामध्ये  ५  सभागृह  आहेत .स्वातंत्र्य  चळवळीचा  इतिहास   चित्राच्या   प्रदर्शनातून मांडण्यात  आला  आहे .गांधीजीनी  वापरलेल्या  वस्तू ,बेड ,डेस्क ,कपडे  येथे  काळजीपूर्वक  ठेवण्यात  आले  आहेत. हा  राजवाडा  वर्षातील  ४  दिवस  दिवाळी ,मोहरम ,धुलीवंदन  आणि  अनंतचतुर्दशी सोडून  सर्व  दिवशी  पाहण्यास  उपलब्ध  असतो . त्यासाठी  फक्त  ५  रुपये  शुल्क  आहे . स्वातंत्र्य लढ्याबद्दल  आपणास  जाणून  घ्यायचं  असल्यास  एकदा  तरी  नक्की  भेट  द्या .हि  माहिती  खास  मेड  इन  पुणे  च्या  वाचकासाठी ..आवडल्यास  नक्की  शेअर  करा ..आम्हाला  आपल्या  प्रतिसादाची  आवश्यकता  आहे .

0 comments:

Post a Comment